Posts

भारतीय प्रजासत्ताकाचे सत्तरावे वर्ष

Image
भारतीय प्रजासत्ताकाचे सत्तरावे वर्ष दोन राष्ट्रीय सण         स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन या दोन राष्ट्रीय सणांमधील कांही उघड साम्य स्थ ळे आहेत. दोन्ही दिवशी सार्वजनिक सुटी असते. शा ळा , कॉलेजे आणि सरकारी कार्यालयांत झेंडावंदन होते. संचलने , प्रभातफे-या अशा उत्साहदर्शक कार्यक्रमात विद्यार्थी सहभागी होतात. हल्ली महानगरातील सोसायट्यात असेच कार्यक्रम आणि खानपानही केले जाते. पंधरा ऑगस्टला ब्रिटिशांचे राज्य संपले तर सव्वीस जानेवारीला आपण नवीन राज्यघटना स्वीकारली हा फरकही बहुतेकांना माहीत असतोच. पण गुलामी संपली , स्वातंत्र मि ळा ले ही महत्वाची पण भूतका ळा त घडलेली घटना. स्वातंत्रप्राप्तीचा आनंद , स्वातंत्र्यलढयात सहभागी सर्व स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग , कांहीचे हौतात्म्य यांचे स्मरण , आणि यांबद्दल नवीन पिढीला माहिती देणे या सर्व बाबीही तिच्याशी संबंधित आहेतच. पण या सर्वांचा सबंध भूतका ळा शी आहे.         घटना बनविण्याचे काम लवकर आणि यशस्वीरित्या पूर्ण झाले या भूतकालीन घटनेचा आनंद प्रजासत्ताकदि...

कवितेचा अर्थ

Image
       CAA आणि NCR विरोधी निदर्शनांमध्ये फैझ अहमद फैझ यांच्या हम देखेंगे या कवितेचे वाचन/गायन करण्यात आले . अशा प्रसंगी गाणी , नाच अशा समूह कृति प्रत्यही केल्या जातात. या कवितेचा वापर होण्याचे मुख्य कारण असे की १९७९ च्या सुमारास लिहिलेल्या पाकिस्तानचे लष्करशहा जनरल झिया उल हक़ यांच्या राजवटी विरोधी निदर्शनात तिचा वापर करण्यात आला. या कवितेवर पाकिस्तानात बंदी घातली गेली आणि सहाजिकच तिची लोकप्रियता वाढली. अनेक गायकानी ती गायली आहे. CAA आणि NRC ला विरोध करणा-याना ती का भावली   हम देखेंगे                  लाज़िम है कि हम भी देखेंगे                   वो दिन कि जिसका वादा है   जो लोह-ए-अज़ल [1]   में लिखा है         जब ज़ुल्म-ओ-सितम के कोह-ए-गरां   [2]   रुई की तरह उड़ जाएँगे         ...

लोकसंख्यावाढीची समस्या : महत्वाची का तांतडीची ?

Image
लोकसंख्यावाढीची समस्या : महत्वाची का तांतडीची ?         ज्या नागरीकत्व दुरूस्ती कायदा (नादुका) ( CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी ( NRC) या दोन बाबींवर सध्या चर्चा आणि आंदोलने होत आहेत त्याचा संबंध अतिरिक्त लोकसंख्यावाढ आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर येणारा ताण याच्याशीही आहे. नागरिक नोंदणीमु ळे बेकायदेशीर परदेशी स्थलांतराला आ ळा बसेल असे तिच्या समर्थकाना वाटते. नादुकाला होणारा विरोध ते घटनेशी विसंगत आहे कारण त्यातून नागरिकत्वाबाबत धर्माधारे भेदभाव होतो हा विरोधाचा मुख्य मुद्दा आहे. आसाममध्ये नागरिक नोंदणीही महत्वपूर्ण बाब बनली कारण बांगलादेश मधून होणा-या स्थलांतरामु ळे लोकसंख्येत मोठी वाढ होउन आसामी सांस्कृतिक जीवन धोक्यात येते अशी आशंका तेथील रहिवाशांच्या मनात निर्माण झाली आहे. स्थलान्तर हे लोकसंख्या वाढण्याचे एकमेव कारण नसले तरी त्यामु ळे लोकसंख्येचे केन्द्रीकरण होत असल्याने लोकसंख्यावाढीची समस्या जाणवण्यात स्थलान्तर आणि नागरीकरण या बाबी जास्त महत्वाच्या ठरतात. परदेशी नागरिकांचा लोंढा हे सांस्कृतिक आक्रमण ठरते ही भीती फक्त सीमावर्ती रा...

नवे नागरिकत्व ?

Image
नवे नागरिकत्व ?       आपल्या निवडणूक वचननाम्यात नमूद केल्याप्रमाणे भाजपने तांतडीने नागरिकत्व दुरूस्ती विधेयकास संसदेची मान्यता प्राप्त करून घेतल्यानंतर लगेचच आसाम आणि ईशान्येकडील इतर राज्यात अस्वस्थता आणि असंतोष निर्माण झाल्याने नागरिकत्व दुरूस्ती कायदा (नादुका) आणि सध्या आसाममध्ये अंमलबजावणी सुरू असलेले राष्ट्रीय नागरिक नोंदणी पत्रक ( National Citizen Register) यांचा परस्परसंबंध स्पष्ट होतो. आता असंतोष इतरत्रही पसरल्याने नादुकाशी निगडित नागरिकत्व , धर्म आणि स्थलान्तर या तीन घटकांचा विचार करणे योग्य ठरेल. स्थलान्तर           आदिम कालापासून माणसांचे समूह स्थलान्तर करत आले आहेत. एखाद्या ठिकाणी रहाणे कठीण झाले की नवी सोईस्कर जागा शोधली जाई. आता मानवी समुहांची लक्षणीय प्रगती झाली असली तरी स्थलांतराची मूल प्रेरणा कायम आहे. उपजीविकेच्या सरस साधनासाठी व्यक्तिश: किंवा सामूहिकरित्या आजही स्थलांतरे होतातच. राज्यराष्ट्रे उदयाला आल्यानंतर स्थलान्तर राष्ट्रीय का आंतरराष्ट्रीय ही बाब कायदेशीर महत्वाची बनली. पण चांग...